18.11.09

लेह बाईक ट्रीपची पूर्वतयारी - सराव ट्रीप राजमाची

आता सराव ट्रीपचा मुहूर्त शेवटी लागला. अभिजीतला जे कोणी लेहला येणार आहेत त्यापैकी प्रत्येक जण राजमाचीला यायला हवे होते, कारण आम्ही सर्व एकत्र पहिल्यांदा भेटणार होतो आणि बऱ्याच गोष्टींवर त्याला चर्चा करायची होती. पण नेहमीच्या सवयी प्रमाणे म्हणा किंवा ट्रीपला महत्त्व नाही दिल म्हणून, काही जण नाटक करू लागली. आता अभिजित आणि आम्ह्च्या डोक्यात जायला लागल होत, लोकांचा  निष्काळजी आणि बेजवाबदारपणा तर कहर करून डोक्यावरून वाहायला लागला होता. यातच अभिजित आणि आम्ही काही कठोर निर्णय घेतले, जे अभिजित सर्वान बरोबर राजमाचीवर चर्चा करणार होता. अभिजितने या राजमाची ट्रीपच्या पण सर्व गोष्टी व्यवस्थित प्लान करून पाठवल्या आणि सर्वाना १०० % उपस्थितीचे आव्हान केल.

आता राजमाचीला जायचा दिवस उजाडला, आम्ही सर्व ठाण्यात दुपारी भेटून मग पुढे एकत्र राजमाचीला जायचं ठरल होत. याच लेह ट्रीपसाठी मी माझी पहिली बाईक (TVS Victor) विकली होती, म्हणून माझ्याकडे बाईक नसल्या कारणास्तव अभिजितने माझी सोय संजूचा पिलियन रायडर म्हणून केली होती. मी सकळी समान भरून ४६० बसने मुलुंड वाया ठाण्याला जायचे ठरवले. एक तर ती बस पाऊन तास आलीच नाही आणि मग दुनिया भर फिरून तिने मुलुंडला फार उशिरा पोहचवले. सारखे मला या सर्वांचे फोन येत होते. शेवटी अभिजित आणि संजू मला वोकार्ड हॉस्पिटलच्या समोर घ्यायला आले आणि बाकी सर्वाना ऐरोली सिग्नल जवळ थांबायला सांगितले होते. सगळ्यांनी मला उशिरा आल्या बदल शिव्या घातल्या आणि आम्ही सर्व राजमाचीच्या दिशेने निघालो. सर्व पहिल्यांदा एकत्र बाईक ट्रीप करीत असल्या कारणास्तव, आमच्या मध्ये ताळमेळ अजिबात नव्हता. आम्हा सर्वान मध्ये ताळमेळ राखायचे काम करीत होते ते मोबाईल फोन. संजूची होती जुनी स्टॅंडर्ड बुलेट, तिच्या मध्ये पिक-अप आणि बरेच प्रॉब्लेम होते. मला आणि संजूला वाटल कि आम्ही फार मागे पडलो आहोत, म्हणून संजूने जरा बाईक रेमटवली आणि आम्ही खोपोलीला पोहचल्यावर अभिजितला फोन केला. आम्हाला कळाल कि हे सर्व मागे आहेत, मग एक एक करून सर्व रमाकांत येथे पुन्हा एकत्र भेटलो. सर्व नवीन मंडळीची तोंड परिचय येथे, नाश्ता व बटाटे वडे खाता खाता होत होती. यात ऐश्वर्या, पूनमची टेर खेचणे काम आणि बरीच मस्ती चालली होती. मी या सर्वातून अभिजितला सांगितल, आपल्या मध्ये जराही ताळमेळ नाही आहे. कारण आज जर मोबाईल फोन नसते तर आपल्या मध्ये फार गोंधळ झाला असता. लेहला तर मोबाईल फोन चालतील कि नाही हे आम्हाला माहित नव्हते, याच कारणास्तव मला सराव ट्रिप्स मधून ताळमेळ आण्याची गरज भासत होती.

आता पुढे घाट आहे आणि राजमाची फाटा फक्त, अभिजित आणि मलाच माहित होता. म्हणून संजूची बाईक पुढे, मध्ये सर्व बाईक्स आणि अभिजितची बाईक शेवटी. अशा प्रकारे आम्ही सर्व एकत्र राजमाची फाट्या पर्येंत जायचं ठरवल, जे काय व्यवस्थित पाळल गेल नाही आणि आम्ही सर्व कसे बसे राजमाची फाट्याला पोहचलो. पुढचा रस्ता खडतर, बैलगाडीचा आहे हे मला आणि अभिजीतला माहित होते म्हणून हळू जायचे ठरले. दरम्यान अंधार पडायला हि सुरवात झाली होती. राजमाचीच्या ४ किलोमीटर अलीकडे संजूची बुलेट बंद पडली, क्लच दाबून किक मारल्यावर जसे होत तसे होत होते. किक फ्री होत होती म्हणून बाईक चालू होत नव्हती. आम्ही बाईकला धक्का मारून ही पाहिले, तरी बाईक चालू होईना. मग संजूच्या बाईक मेकॅनिकला फोन लावून सर्व अडचण सांगितली आणि त्याने आम्हाला किक जवळच्या डब्यात एक नट सैल करून त्यातील स्क्रू घट्ट करायला सांगितला आणि मग पुन्हा तो नट घट्ट करा असे सांगितले. संजयच्या बाईक मध्ये टूल किट नव्हता म्हणून मी काहीहि करू शकत नव्हतो, तत्पूर्वी रोहन आणि अभिजित पुढे गेले होते. मी अभिजीतला फोन लावून सर्वांना राजमाची गावात मामांकडे सोडून, तू आणि रोहन सर्वांच्या गाडीतले टूल किट घेऊन परत येण्यास सांगितले. आम्ही चौघांनी अंधारात हेड टॉर्चच्या प्रकाशात एक एक हात मारून पहिले, तरीही काही केल्या बाईक चालू झाली नाही. शेवटी बाईकच उद्या सकाळी बघू असे ठरवून आम्ही बाईक झाडात लपवून राजमाची गावात मामांकडे जाण्यास निघालो. रस्त्यात एका भुस-भुशीत मातीच्या चढत्या वळणावर अभिजीतच्या बाईकचे पुढचे चाक वर होऊन तो पडला आणि मातीत माखला गेला. हे दृश्य मी पाहता पाहता जोरात ओरडलो, अरेरे.... पडला पडला .......या नंतर चौघेही पोटात खड्डा पडे पर्येंत हसायला लागलो.

मामांकडे छान जेवण करून आम्ही मनोरंजन आणि श्रीवर्धन गडाच्या मधल्या गळीत असलेल्या देवीच्या मंदिरात निजायला गेलो. मंदिराच्या पडवीत आम्ही सर्वांनी पथारी पसरली आणि यातच मला पिंगे काका (माझ्या मावशीचे मिस्टर) यांचा फोन आला, त्यांचा मुलगा (रोहन) याचा आठवड्या पूर्वीच झालेला साखरपुडा मोडला हे कळाले. यावर माझी आणि काकाची फार वेळ चर्चा झाली आणि मला फार राग आला होता हे सर्व ऐकून. आता पर्येतचा प्रवास, बुलेट बंध पडून दुरुस्त करण्याचा प्रयेत्न आणि त्यात केलेली मजा या सर्वावर, हि धक्कादायक आणि दु:खद घटनेने विरजण पडले. या मुळे मूड पूर्ण हटला पण काय करणार शेवटी काम हे काम आहे, ते केलच पाहिजे. बाकी सर्व माझा फोन संपण्याचीच वाट पाहत होते आणि तो पर्येंत सर्वांची मस्ती चालली होती.

बराच उशीर झाला होता आणि सर्वाना झोप पण येत होती, तरी पण आमच्या ट्रीपची हि पहिली एकत्र सामोरा-समोर होणारी चर्चा होती. अभिजित आता सर्व पत्ते उघडणार होता. जे लोक निष्काळजी आणि बेजवाबदारपणा दाखवत होते, त्यांना या ट्रीप मधून वगळण्याचा निर्णय अभिजितने सर्वांच्या पुढ्यात मांडला आणि त्यावर सर्व सहमत झाले. या नंतर बऱ्याच चर्चा झाल्या, विचारांची देवाण घेवाण पण झाली आणि सर्व झोपी गेलो. पहाटे मामानी चहा व नाश्ता वरतीच मंदिरात आणला आणि सर्व जण नाश्ता करून गड फिरायला गेले. मी, अभिजित आणि संजू, त्याची बुलेट दुरुस्त करायला गेलो. बरीच मारा-मारी आणि मेकॅनिकने सांगितल्या प्रमाणे उपद्याप करून कशी बशी एकदाची संजूची बाईक चालू झाली. बुलेट चालू करायचा अनुभव कधीच विसरू शकत नाही आणि त्याच क्षणा पासून मी बुलेट बुक नाही केल्याचा आनंद मानत होतो. आम्ही गड बरेचदा पाहिला होता म्हणून सर्व आवरून मामांकडे समान ठेवले आणि तलावावर अंघोळीला गेलो. दुपार पर्येंत सर्वजण गड आणि तलाव परिसर फिरून मामांकडे जेवायला आलो. जेवण करून आम्ही सर्व परतीच्या प्रवासाला लागलो. अभिजित राव पुण्यावरून मुंबईला चालला होता, म्हणून मी येता-येता त्याला राजमाचीच्या रस्त्यावर मधेच आम्हाला भेट असे सांगितले होते. मी अमेय म्हात्रेला सांगितले कि समोरून येणारी कुठली अवेंजर दिसली तर त्याला तिथेच थांबायला सांग. थोड्या वेळाने तो भेटला तिथेच आम्ही बाकीच्यांची वाट पाहत बसलो होतो. इतक्यात आदित्य, अमोलची बाईक पंचर झाल्याचे आम्हाला सांगायला पुढे आला. आम्ही सर्व फाट्या पर्येंत जाऊन, चहा पीत बसलो. मागाहून थोड्या वेळाने अभिजित आणि अमोल टायर काढून पंचर काढायला बाहेर फाट्या पर्येंत आले.

मी, अभिजित राव, अमेय म्हात्रे, संजू आणि कविता सर्व वेस्टनला राहत होतो म्हणून पुढे निघायचे ठरवले आणि बाकी सर्व सेन्ट्रलला राहतात म्हणून पंचर काढून मागाहून येणार होते. पनवेल येईच तो अंधार पडायला चालू झाला होता, यातच अमेय म्हात्रेच्या बाईक चालवण्याच्या पद्धतीने तो घाबरतोय हे मला आणि अभिजित रावला जाणवले. नंतर चार्चान्ति तो हायवेवर पहिल्यांदा बाईक चालवतोय हे हि कळाल. मी अभिजित रावची बाईक कविताला मागे घेऊन चालवायला घेतली आणि अमेय म्हात्रे त्याची बाईक अभिजित रावला मागे घेऊन चालवायला लागला. याच कालावधीत अभिजित रावने अमेय म्हात्रेचा ब्रेन वॉश केला. पुढे ऐरोलीवरून कविताला संजू बरोबर पाठवले आणि आम्ही घोडबंदर वरून गेलो, कारण अमेय म्हात्रेला हा रस्ता जवळ पडणार होता. पण संजूच्या मते वसई, जे. वी. एल. आर. वरून जवळ पडेल आणि आमच्या मते वसई, घोडबंदर वरून जवळ पडते असे त्याला सांगत होतो. संजू काही केल्या जराही ऐकेना. शेवटी नाईलाजास्तव आम्ही त्याला कविताला बोरिवलीला घरी सोडून तू घरी जा आणि आम्ही अमेय म्हात्रेला फाउंटन हॉटेल पर्येंत सोडले. पुढे तो वसईला गेला, कारण तो रस्ता त्याला माहित होता आणि अभिजित राव मला कांदिवलीला सोडून पुढे घरी गेला.

3 comments:

  1. बाईक ट्रिपमध्ये किती अनंत अडचणी येऊ शकतात याची जाणिव आहे मला....:)वाचतेय.

    ReplyDelete
  2. अरे हो की ... अभ्याचा 'विली' तिकडे 'राजमाची'लाच झाला होता की ... [:D]

    ReplyDelete
  3. अमेय साळवी - फटका माणूस3/12/09 13:55

    हा रे, फार हसत होतो आपण त्या वेळेला. काही छान आठवणीतले क्षण.

    ReplyDelete