13.2.10

लेह बाईक ट्रीप - दुसरा दिवस (जम्मू ते श्रीनगर)

जसे रात्री मीटिंग मध्ये ठरले तसे सर्व सकाळी लवकर उठून तयार झाले. सामान घेऊन सर्व बाहेर आलो. मग आम्ही बाईक्स चालू करून ठेवल्या. अभिने गाडीवाल्याला फोन लावला. गाडी निघालिच होती. कालच्या नाटकावरून गाडी बद्दल थोड टेन्शनच होते.... वेळेत येते कि नाही येत. गाडीची वाट पाहत आम्ही अंगणातच उभे होतो. तेवढ्यात उमेशने फोटोसाठी सर्व बाईक्स एका बाजूला एक उभ्या करायला सांगितल्या. तेव्हा काढलेला हा फोटो.मग मुलींना पण फोटो काढायची लहर आली. त्यांची हि इच्छा पूर्ण केली. तो हा फोटो ............
तेवढ्यात गाडी आली. दिवस भर लागणार सामान आम्ही बाईक्स वर ठेवले आणि बाकी सर्व गाडीत टाकले. फक्त तीनच जण गाडीत बसणार होते म्हणून आम्ही मागे आणि वरती सामान टाकले. उमेशला सुरवात शूट करायची होती म्हणून आम्ही हॉटेलच्या गेट बाहेर थांबलो. अभी-मनाली , मी-ऐश्वर्या , अमेय म्हात्रे-कुलदीप , आदित्य-साधना , आशिष-उमेश असे बाईक वर आणि दिपाली , पूनम व शोबित असे गाडीत. ठरल्या प्रमाणे बरोबर सातच्या दरम्यान आम्ही निघालो.
आमचा आजचा प्रवास जम्मू ते श्रीनगर २८० किलो मीटरचा राष्ट्रीय महामार्ग १ ने होणार होता. जम्मू शहराची हद्द सोडली आणि उमेशला परत एक फुटेज हवे होते. फुटेज घेऊन आम्ही पुढे निघालो. पहिला दिवसच होता म्हणून कि काय कोण जाणे , आम्ही सर्व शिस्तीत ताळ-मेळाने हळू-हळू रस्ता कापत होतो. किंवा रस्त्याला थोडी रहदारी पण होती म्हणून म्हणाना.


पण बिना मजबूत सरावाचे सुद्धा आमच्या मध्ये चांगलाच ताळ-मेळ होता. उमेशला शूटिंग करायचे होते म्हणून आशिष उमेशच्या सांगण्यावरून बाईक चालवायचा. थोडस पुढे गेल्यावर आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. तेव्हा ऐश्वर्याला कळाले कि माझ्या कॅमेरा लेन्सची कॅप रस्त्यात पडली आहे. पण आशिष आणि उमेशने ती पडताना पहिली होती. ते आमच्या मागेच होते म्हणून त्यांनी उचलून आणली. मजबूत दाबून नाश्ता केला. भूक पण तशीच लागली होती आणि आम्ही नाश्ता दाबून करायचा ठरवलेच होते. कारण पुढे कधी आणि कसे खायला मिळेल माहित नव्हते. आमच एक बाकी नक्की होत , कुठेही थांबलो कि मस्ती चालू. याप्रमाणे इकडे हि चालू झाली , बहुतेकदा ऐश्वर्या आणि पूनम टार्गेट असायचे पण कधी कधी हि लाट माझ्यावर पण यायची. मी घरी आईला फोन केला म्हणून मला हि चिडवायला लागले "बायकोला फोन केलास का रे ? मग काय म्हणाली ?" आणि वगैरे वगैरे. दीपालीने तर तेथे सासूबाईनी दिलेलं मिल्क शेक बनवल आणि त्या बरोबर बिस्कीट खायला सुरवात केली. तिथून निघताना उमेशने माझ्या पाया जवळचा एक फुटेज घेतला. मला त्या वेळेला हे सर्व थोडस विचित्र वाटल पण जेव्हा शो टेलि का स्ट झाला तेव्हा उमेशच्या करामतीचे महत्त्व कळल. अधून मधून फोटोग्राफी साठी आम्ही थांबतच होते. मधेच हा दिसलेला धबधबा , मंदिर , किल्ला आणि निसर्ग रम्य परिसर. तेव्हा काढले ली काही छायाचित्र............






पण आम्हाला अजून २५१ किलो मीटर जायचे होते. वास्तविक हे दिलेले किलो मीटर्स आणि अस्तित्वात असलेले किलो मीटर्स मध्ये जाम फरक होता. पण एक आधार म्हणून चालू शकतो आणि आम्ही ही तेच करत होतो. भरपूर रस्ता कापत आम्ही पटनी टॉपला पोहचलो. पटनी टॉप सुमारे ६५०० फुटावर आहे. त्यामुळे वातावरण आता बदलायला लागले होते आणि छान झाडांच्या थंड सावलीत आम्ही ब्रेक घेतला. २ दिवसात पहिल्यांदा गार वाटले. ब्रेक म्हटले कि आमचे खाणे आणि बागडणे आलेच. आम्ही तिथे चहा आणि कणसे घेतली. माझे पुढचे ३ दात खोटे आहेत आणि कॉलेजला असताना नाक्यावर एकदा कणीस खाताना माझी कॅप तुटली होती , म्हणून मी काही हिम्मत केली नाही. मला पूनम , दिपाली , साधना आणि ऐश्वर्या कणसाचे दाणे काढून देत होते आणि मी मात्र आरामात खात होतो. पटनी टॉपला येण्या आधी आशिष आणि उमेश बरेच पुढे निघाले होते , कारण त्याला शूट करायच होत. एका सुंदर वळणावर तो सेट होऊन बसला आणि एका पाठून एक असे आम्ही येत होतो , त्याने तो क्षण फारच छान टिपलाय व ते फुटेज शो मध्ये पण वापरले आहे. मग दीपालीच्या भाषेत सुसू वगैरे करून आम्ही पुढे निघालो. " अधून मधून आम्ही ब्रेक घेतच होतो. कारण बाईक्सचा वेग आणि गाडीचा वेग हे समीकरण काही जुळत नव्हते , ते कधी जुळणार हि नव्हते आणि जुळणार हि नाही. गाडी पुढे जाऊन आमच्या करता थांबायची. तेव्हा घेतलेला हा फोटो......... आणि बघतोय तर काय , समोरून एक बाई डोक्यावर घमेल घेऊन येत होती. मी तिचा फोटो काढायला सज्ज झालो , पण तेवढ्यात तिने मला फोटो काढताना बघितले आणि तिच्या चेहऱ्यावरचे भावच बदले. हा तो फोटो.......... पण मला हा भाव बदलेला फोटो जास्त आवडला , कारण मला तिच्या चेहऱ्यावर आपला फोटो काढतोय म्हणून मिश्कील हास्य दिसत आहे. ते मिश्कील हास्य आपलाही कोणीतरी फोटो काढतोय म्हणून साफ भावना झळकत होत्या. तिचा कॅमेरा कडे झालेला आय कॉंटॅक्ट , छान मिश्कील हास्य , हे मला खूप आवडले. वास्तविक मला जसा फोटो काढायचा असतो , तसा नाही मिळाला तर मी बहुतेकदा वैतागतो. हा फोटो पाहून तसे काही झालेही. थोडीशी सुरवात झाली होती तिने भाव बदलला म्हणून , मग फोटो बघितल्यावर शांत झालो. असेच अधून मधून फोटोग्राफीसाठी किवा ब्रेक म्हणून थांबत थांबत आम्ही चाललो होतो. एकदा मी फोटोग्राफीसाठी थांबलो असताना , मी बाईक लावली आणि रस्त्याच्या त्या बाजूला फोटो काढण्यात गुंग झालो. इतक्यात ऐश्वर्याचा आवाज आला "पडली पडली" मला वाटल ऐश्वर्या पडली , बघतोतर काय बाईक पडली होती आणि ऐश्वर्या बाईक उचलण्याचा प्रयत्न करीत होती. मी जाऊन बाईक उचलली तर ऐश्वर्या म्हणते "उचलायचा प्रयत्न केला , पण फार जड आहे". मग आम्ही पुढे निघालो , आता डोक्यावर ऊन रण-रणायला लागले होते आणि पोटातही रण-रणत होते.
पुढे एक धाबा पाहून आम्ही थांबलो , खायला फक्त "राजमा आणि चावल" असे कळले. मग काय पर्याय नाही म्हणून हाणायला सुरवात केली. तो आणत होता आम्ही हापसत होतो. त्याने आम्हाला बाल्कनीत बसायला दिले. तिथून एन. एच. पी. सी. (नॅशनल हाइड्रो एलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन) च धरण फार छान दिसत होते. पेट पूजा करून आम्ही पुढे निघालो. रोहन-शमिका विमानाने श्रीनगरला पोहचल्याच कळले.


पुढे आम्हाला हि पाटी दिसली.......




आणि हे ते निसर्ग रम्य काश्मिरच पहिले दर्शन......... आम्ही इकडे ब्रेक घेतला आणि नेहमी प्रमाणे मस्ती चालू झाली. मस्ती मस्ती मध्ये कुलदीपच कठड्यावर ठेवलेले हेल्मेट खाली पडले. मग २० - ३० फुट खाली जाऊन त्याने ते आणले.

" पुढे मधेच एक मोठा सुमारे २.५ ते ३ किलो मीटरचा बोगदा (जवाहर टनेल) लागला. बोगदा पाहून मी ग्लेयर्स काढले आणि चष्मा घातला. तेवढ्यात मला एका आर्मी जवानाने "गाडी रोकना नही , आगे चलो" म्हणून आवाज दिला. तिथून निसटलो आणि बराच वेळ गाडी चालवून झाली म्हणून चहाचा ब्रेक घेतला.
इथे एका ट्रक मधून इसम उतरला आणि चहा पीता-पीता विचारू लागला "किधर से हो आणि वगैरे वगैरे"..... मग विचारल "हिंदू हो ?", मी "हो आहे" उत्तर दिल्यावर म्हणाला "श्रीनगर में हिन्दू हॉटेल में ही खाना खाना , पता नहीं क्या खिला देंगे". मला थोडस विचित्र वाटले आणि दादर मधल्या पूर्वीच्या "हिंदू हॉटेल" ची आठवण आली. तेच हिंदू हॉटेल जाऊन , गुजराती आणि मारवाड्यान मुळे ते आता "प्यूर वेज रेस्टोरेंट" झाले.
पुढे २ तासभर बाईक चालवून श्रीनगर जवळ चललो होतो. छान रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे पाहून , थोडा ब्रेक घेऊन चहा आणि बिस्कीट खाल्ली . आता अंधार पडायला लागला होता , पण रस्ता पुढे सरळ होता असे कळाले . कारण सकाळी नाश्ता केल्या पासून आत्ता पर्यंत नुसता घाट आणि वळण. रोहन आणि अभीच अधून-मधून फोना-फोनी चालूच होती. शेवटचा पल्ला पार करून आम्ही ९च्या दरम्यान श्रीनगरला पोहचलो. रोहन-शमिका आमची वाटच पाहत होते. मला वाटले कि बिचारे दिवसभर वाट पाहून कंटाळ ले असतील. पण ते मस्त श्रीनगर फिरून आले होते. मग सर्वाना आप-आपल्या रूम दिल्या आणि कालच्या प्रमाणे मी , शोबित व दादा एकत्र. आशिषला संपूर्ण १५ दिवसात मी जे पाहिलं नाव तोंडात येईल त्या नावाने संबोधिले आहे . मग फ्रेश होऊन जेवणासाठी गार्डन मध्ये आलो.
सर्व फारच थकले म्हणून अभिने जेवतानाच मिटिंग घेतली आणि थोडा वेळ चर्चा केली. उद्याची पण चर्चा केली आणि सर्व तयारी करून आम्ही झोपी गेलो. 

No comments:

Post a Comment