10.2.10

लेह बाईक ट्रीप - पहिला दिवस (मुंबई ते जम्मू)

८ ऑगस्ट २००९, ज्याची वाट पाहत होतो तो दिवस आला. मी आणि शोबित एकत्र विमानतळावर पोहोचलो, थोड्या वेळाने आशिष आणि दिपाली पण आले. आम्ही त्यांची बाहेरच वाट पाहत होतो, अमोल त्यांना सोडायला आला होता. अमोलचा निरोप घेऊन आम्ही आत शिरलो. आयुष्यात चौघेहि पहिल्यांदा विमानाने प्रवास करत होतो, त्याप्रमाणे आम्ही एक किस्सा हि केलाच. सर्व चेकिंग आणि बोर्डिंग पासच काम झाल्यावर आम्ही पुढे निघालो. तेथील एका कर्मचार्याने आम्हाला अडवले. "साहेब ट्रॉली ह्याच्या पुढे नाही" असे सांगितले, म्हणून आम्ही आप-आपल सामान पाठीवर लावायला लागलो. आम्ह्च्या मोठ्या सॅक्स पाहून तो म्हणाला, "ह्या कॅबीन बॅगा आहेत का?" आम्ही म्हणालो नाही "या, तर चेकीन बॅगा आहेत. आमच्या मोठ्या सॅक्स पाहून त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि आम्ही मात्र वेद लागल्या सारख हसत होतो. या आमच्या प्रसंग वरून मला पु.लं. च्या "प्रवास" या कथाकथनाची आठवण आली. मग पुन्हा कुठे त्या एकदाच्या बॅगा दिल्या आणि विमानात बसून जम्मूस निघालो. शेवटी एकदाचे जम्मुला पोहचलो.


 अभिजीत, मनाली, ऐश्वर्या, आदित्य, साधना अणि उमेश हे ७ ऑगस्ट २००९ ला मुंबई वरून ट्रेनने निघाले होते, त्यांची ट्रेन दुपारी ३ वाजेपर्यंत येणार होती. अमेय म्हात्रे, कुलदीप अणि पूनम हे पण ७ ऑगस्ट २००९ ला मुंबईहून विमानाने जम्मुला आले होते पण ते वैष्णव देवी करू भेटणार होते. अमेय म्हात्रेशी फोन वर बोलन झाल आणि कळाल कि ते जम्मूला परत येत होते. अभिशी फोन वर बोलून हॉटेल आणि गाड़ी बद्दल सर्व माहिती घेतली. आम्ही ५ बाईकर्स व त्यांच्या पाठी ५ जण आणि उरलेल्या ५ जणानकरिता गाडी केली होती. या गाडीचा सपोर्ट वेहिकल म्हणून वापर करता येईल असे आमचे ठरले होते पण ती गाडी कधी सपोर्ट म्हणून लेह पर्येंत कामाला आलीच नाही. आता हे हि सांगायलाच पाहिजे कि लेह पर्येंत का, जम्मू-श्रीनगर, लेह आणि मनाली अशा ३ युनियन आहेत. जम्मूची गाडी लेह पर्यंतच सोडू शकते, तसेच लेह्ची मनाली पर्येंत. हा तिकडच्या युनियनचा विचित्र फंडा आहे आणि यातील एका फंडया नुसार जम्मू शहरातील गाडी विमानतळावर घेण्यास येऊ शकत नाही, असे मला त्या गाडीवाल्याने सांगितले. वरून "तुम टॅक्सी लेकर हॉटेल पर जाओ" असे सांगितले. मग काय पर्याय नाही म्हणून आम्ही टॅक्सी पकडून हॉटेल वर गेलो. त्यात प्रचंड भूक लागली होती. छान काश्मिरी जेवण जेऊन आम्ही रूम वर आराम करीत बसलो होतो तरीही हाताला हळदीचा वास येत होता. जेवण फारच छान होत. तेवढ्यात अमेय म्हात्रे, कुलदीप आणि पूनम आले, ते तर फारच थकले होते कारण एका दिवसात मुंबई ते जम्मू मग बाईक घेऊन वैष्णव देवी करून परत जम्मूला आले. माझ्या मताने वैष्णव देवी आता करायला नको हवी होती, कारण पुढे १५दिवस खडतर होते. थोडा आराम करून आम्ही रेल्वे स्टेशन वर गेलो, अमेय ने आदित्यची पल्सर आणि कुलदीपची एफझी घेतलीच होती. त्याच बाईक घेऊन ते वैष्णव देवीला गेले होते, माझी एवेंजर व रोहनची युनिकोन घेतली. पण पार्सल ऑफिसर फारच सज्जन आणि इमानदार होता, काही केल्या अभिची डिस्कवर देईना. तो म्हणाला "रिसीट लाओ और बाईक लेके जाओ" आणि हे वाक्य त्याने शेवट पर्येंत सोडलच नाही. त्याला आम्ही भरपूर पट्टी पडवायचा प्रयेत्न केला तरी पण भाडखाव काही केल्या तयारच होईना. त्याला आम्ही पैसे पण देण्याचा प्रयेत्न केला, तरी पण तेच "रिसीट लाओ और बाईक लेके जाओ". शेवटी हतबल होऊन आम्ही त्याच्या हाताखालच्या माणसाला पकडला. पण त्याला हि त्याने बजावले "पैसा लेके कम करेगा तो नौकरी से निकाल दूंगा". अभिजीतला कधी मी, कधी अमेय म्हात्रे, कधी आशिष फोन करून सारखे कुठे आहेस - कुठे आहेस? असे चालले होते. ट्रेन ४-५ किलो मिटर वर जम्मू स्टेशन पासून लांब होती पण सिग्नल नाही म्हणून जवळ जवळ तास भर तिकडेच थांबली होती. पार्सल ऑफिस चा पुढचा भाग बंद करून ऑफिसर एक एक दरवाजांना सील ठोकायला लागला. आता मात्र आमची फाटली, आम्ही पण सारखे रट लावून त्याच्या पाठीमागेच होतो "साहाबजी जरा रुकोना १५ -२० मिनिट" पण तो काही केल्या ऐकेना. फक्त त्याची रट बदली होती "अब कल आओ सुबह ९ बजे" आणि तो वळकटी लावुन निघाला. आम्ही त्याच्या पाठीच होतो, या सर्वात अभिला प्रत्येक मिनटाला कोणी ना कोणी आमच्या पैकी फोन करून सांगत होतो. शेवटी अभिने ट्रेन सोडली आणि रेल्वे लाइन वरून पळत सुटला. इकडे आम्ही पार्सल ऑफिसरला तेच सांगितल कि "अब वो दौड़ के आ रहा है, आप ५ मिनिट रुकोना", त्याने मागील दरवाज्याच्या बाहेर जाऊन एक सिगरेट शिलगावली आणि म्हणाला "देखो किधर है वो". आम्ही बोललो "रेल्वे लाइन से दौड़ के आ रहा है" आणि मग "जाओ बाईक लेके आओ अंदर से" असे म्हणाला हे ऐकून आमच्या जीवात जीव आला, पण त्याने मला बाईक दरवाज्याच्या बाहेर नाही काढून दिली. मग तो परत बोलला "किधर हे आप का दोस्त, के मै सील लगावू". वास्तविक तो आमची मस्ती पाहत होता त्याने बाईक द्यायचे ठरवले होतेच. शेवटी लावलेला अभिला फोन तो समोर दिसे पर्येंत चालूच होता. मला त्याच्या धापा ऐकू येत होत्या आणि तो एकदाचा दिसला. आम्ही सगळे ओरडलो "वो आ गया" त्या कडून रिसीट घेऊन ऑफिसरला देऊन गाडी बाहेर काढली आणि अभिला पाणी देऊन बसवले. 
गाडी २ दिवस पार्सल ऑफिस मध्ये उभी केली म्हणून २० रुपये भरायचे होते, पण सर्वान कडे ५० चीच नोट होती. तो बोलला "खुला पैसा दो" मी म्हणालो "रहने दो साहाबजी", तो नाही नाही म्हणत होता पण मी त्याच्या खिशात नोट कोंबली आणि म्हणालो "रहने दो सिगरेट केलीये" त्यावर हि तो बोला "काय समजा हम को?" मी फक्त हसलो आणि धन्यवाद बोलून कल्टी मारली. सर्व बाइक्स बाहेर आल्या. बघितल तर प्रत्येकाच्या बाईकला कुठे ना कुठे तरी लागल होत. तेवढ्यात ट्रेन आली आणि सर्व जम्मू तावी स्टेशनच्या बाहेर भेटलो.
आता दुसरी अडचण, गाडी येणार नव्हती. मग आम्ही लोड फेरी करून सामान आणि माणसे हॉटेल वर पोहचवली. थोडा आराम करून ५ जण पेट्रोल भरायला आणि बाईकस चेक करायला घेऊन गेलो, आदित्यच्या बाईकच्या चैनचा आवाज येत होता म्हणून चैन-स्पोकेट दोन्ही बदलले. बाकीच्या सर्व बाईक्सची छोटी मोठी डाग डुगी करून आम्ही हॉटेल वर परत आलो. फार भूख लागली होती आणि थकलो हि होतो, फ्रेश होऊन जेवायला गेलो.
जेवता जेवता थोडीसी मस्ती चालली होती. वेज, नॉन-वेज भाग झाला. मी नॉन वेज घेणाऱ्यांमध्ये होतो पण ते आणायला फार उशीर लावला. मला प्रचंड भूख लागली होती म्हणून मी पूनम बरोबर सुरवात केली आणि मग नॉन वेज पण खाल्लं. जेवण झाल्यावर अभिने बाहेरच मीटिंग घेतली. उद्याची सर्व माहिती अभिने दिली आणि सर्व तयारी करून आम्ही झोपी गेलो.

No comments:

Post a Comment