31.12.13

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिप - भाग पहिला - बाविसावा दिवस (महाड ते मुंबई)

८  जून २००५, ठरल्याप्रमाणे सर्व सकाळी लवकर उठलो आणि प्रातविधी उरकून सर्व नाश्त्याला आलो. नाश्ता तयारच होता, सुजयचे आई-बाबां तर नाष्टा करून आमचीच वाट पाहत होते. आम्ही पटा-पट नाश्ता उरकला आणि लागलो निघायच्या तयारीला. आम्ही सर्व सामान खाली घेऊन आलो. सुजयचे आई-बाबा तर तयारच होते. ८ च्या दरम्यान आम्ही सर्वांनी घर सोडले. सुजयचे आई-बाबा गाडीत आणि सुजय व मी बाइक वर.

आज सुजयला माझी बाइक चालवायची हुक्की आली. माझ्यात सुजयला नाही बोलण्याची हिमंत नव्हती. पण सुजय मात्र फार नालायक आहे...रावची एण्टाईसर होती त्या वेळेला त्याला माझी विकटर नाही आवडत होती. पण आता त्याला माझी विकटररच चालवायची होती. तरी पण मी त्याच्या बरोबर थोडीशी हुज्ज्त घातलीच. आमच्यात हे असे चालतच असते. आम्हा सर्वांना सुजयच्या या स्वभावाची परिपूर्ण जाणीव आहे. सुजय बाइक चालवत होता आणि मी पाठी बॅग घेऊन मस्त आरामात बसलो होतो. वास्तविक बरेच दिवस बाइक चालवून मी जरा थकलो होतो आणि सुजयच्या या हट्टामुळे मला आज जरा आराम मिळत होता. सुजयच्या बाबांची गाडी आमच्या मगेच होती. थोडा वेळ ते आमच्या मागोमाग होते आणि मग महाड पार करून पुढे गेल्यावर ते आम्हाला बाइक सावकाश चालवा असे बोलून निघाले पुढे.

आता सुजय जरा रिलॅक्स झाला. आई-बाबा मगेच होते म्हणून सुजयचे जास्त लक्ष त्यांच्या कडे होते. मस्त आरामात बर्‍याच ठिकाणी आम्ही थांबत होतो. महाड वरुन सुटलो ते माणगावला थांबलो. मग नागोठण्याला कामत कडे. पुढे वडखळ आणि कर्नाळ्यात थांबून आराम करत. कर्नाळ्या वरुन सुटलो ते मधे कुठे ही ना थांबता थेट रुईया नाक्यावर आलो. दुपारी २ च्या दरम्यान आम्ही नाक्यावर होतो आणि अशा तऱ्हेने आमच्या कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिपच्या पहिल्या भागाचा शेवट झाला. आम्ही एवढे थकलो होतो तरी संध्याकाळ पर्येंत नाक्यावर बाकी सर्व मित्रान बरोबर टाइमपास करत होतो आणि मग आपआपल्या घरी गेलो.  

No comments:

Post a Comment