25.12.13

कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - अकरावा दिवस (कोरले ते देवरुख)


२८ मे २००५, जशी सकाळी जाग आली तेव्हा मी उठलो. तसे पाहिला गेले तर फार उशिराच जाग आली होती. पण आजीने नाष्ट्याला केले पोहे उशिरा का होई ना मी खाल्ले आणि चहा घेऊन आरामात माझे सर्व व्यवहार चालले होते. वास्तविक आंघोळ आणि बाकीचे इकड-तिकडचे करत करत जेवणाची वेळ झाली हे कळले पण नाही. कालच्या शाकाहारी जेवणा नंतर आज बेत होता मांसाहाराचा. आप्पा आजोबांनी मी उठायच्या आधीच कोंबडी आणवली होती. आज पण चिकन मध्ये मस्त ओले काजू...माझी तर काय मस्त मेजवानीच होती आणि या बरोबर मला आवडतात म्हणून आंबे....

मस्त जेवणावर ताव मारला आणि आप्पा आजोबांकडे निघण्याची परवानगी मागायला लागलो. मला त्यांनी अजुन काही दिवस राहा असा आग्रह धरला होता, पण मी त्यांचा फार जास्त मन नाही राखू शकलो. मला देवरुखात काही कामे आहे असे बोलून निघण्याची तयारी करायला लागलो. वास्तविक मला तसे काही फार काम नव्हते पण २ दिवसात आईला देवरुखला बोलावून घेऊन आमची घराची राहिलेली काही कामे होती ती उरकून घ्यायची होती. आई येई पर्येंत मी मस्त निवांत घरात राहून आराम करून घेणार होतो. आठ-दहा दिवसांच्या बाईक ट्रीप मुळे फार थकलो होतो. तस पाहिलं गेल तर आप्पा आजोबांकडे पण आराम करता आला असता पण कशाला आजी-आजोबांना उगाच त्रास द्यायचा अशा विचाराने मी देवरुखला जायचा निर्णय घेतला.

सर्व सामान आवरून आजी-आजोबांचा निरोप घेण्यास निघालोच तर आप्पा आजोबांनी माझ्यासाठी एक गोण  भरून हापूस आंबे बाईक जवळ काढून ठेवले. हे एवढे आंबे मी बाईक वरून कसे नेणार आणि मी एवढे आंबे एकटा तरी कधी खाणार असे बोलायला लागलो. मात्र या वेळेला आप्पा आजोबांनी मला गप्प करून सांगितले आई येणार आहे ना मग दे तिला. आता पण आणि काही नाही, बाईक वर कसे न्यायचे ते मी बघतो असे बोलत सुतळ कोठून तरी आले आणि बाईक वर आंब्याची गोण बांधायला घेतली. पण गोण एवढी मोठी होती की बाईक वर बांधणे फार कठीण जात होते.  म्हणून मी गोणीतले बरेच से आंबे मी माझ्या बॅगेत टाकून घेतले आणि मग उरलेले बाईक वर गोणी सहित बांधले.

आजी-आजोबांचा निरोप घेतला आणि निघालो कोरल्या वरुन देवरुखच्या दिशेने. सर्व आवरून निघे पर्येंत ३.३० - ४ वाजले होते. मस्त आरामात कोकणातला वळणा-वळणांचा रस्ता तुडवत तास-दीड तासात साखरपा गाठले. साखरपा एस.टी. स्टॅंडच्या समोरच्या हॉटेल मध्ये मिसळची भूख् लागली म्हणून आणि थोडा वेळ आराम होईल म्हणून मिसळ खायला घुसलो. मस्त झण-झणित मिसळ खाल्ली आणि गरम-गरम चहा मारून निघालो, देवरुखच्या दिशेने. साखरपा ते देवरुख हा रस्ता तर संपूर्ण छोट्या-मोठ्या घाटींचा मस्त वळणा-वळणांचा आहे. रस्ता तुडवत मी देवरुखला अंधार व्हायच्या जरा आधी पोहोचलो. सर्व सामान बाईक वरुन काढून घरात घुसलो. फ्रेश होऊन घेतले आणि थोडा वेळ आराम करत बसलो.

आज दुपारच्या मस्त चिकन आणि संध्याकाळच्या मिसळ मुळे आता मला रात्री जेवायचे मनच नव्हते. आप्पा आजोबांनी दिलेले आंबे खाऊन घेतले आणि थोडा वेळ पडून राहिलो आणि मग तसाच झोपी गेलो.

No comments:

Post a Comment